‘नक्कल करण्यासाठी अक्कल लागते’ : योगी आदित्यनाथांचा राहूल गांधींना टोला

अहमदाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या गुजरातच्या दौऱ्यावर असून त्यांनी एका जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते. गुजरातमधील लोकांनी राहुल गांधी यांना उघडे केले. तो सोमनाथ मंदिरात गेला. आणि नमाज अर्पण करीत बसला. मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला हे मंदिर आहे, असे सांगितले. म्हणून मी म्हणतो की नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते.

प्रियंका गांधी यांनी केलेल्या गंगा यात्रावरही त्यांनी जोरदार टिका केली. त्यांनी सांगितले की, २४ कोटी भाविक कुंभमेळ्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी गंगा स्वच्छ नाही, अशी टिका केली होती. पण जेव्हा आता मतदानाची वेळ आली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की नवी पिढीही या कुंभमेळ्यांमध्ये आली होती. त्यांनी जेव्हा पाहिले की लोक गंगेचे पाणी पित आहेत, तेव्हा त्यांनीही तेच केले, अशा शब्दात प्रियंका गांधींवर त्यांनी टिका केली.