खड्डयात तरूण-तरूणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

जळगाव :  पोलीसनामा ऑनलाइन – जळगावच्या पाळधी गावात एका खड्ड्यात तरुण-तरुणीचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. मुलीला पळवून नेल्याबाबतीच तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात केली होती. तर मृत तरुण मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होता. या तरुण तरुणीची हत्या झाल्याचा संशय मृत मुलाच्या मित्रांनी आणि मुलीच्या कुटूंबियांनी केली. मृत तरुणाचे नाव जयेश दत्तात्रय पाटील (वय 19, नशिराबाद) असून मुलीचे प्रिया दत्तात्रय पाटील (वय 15, माळीवाडा, पाळधी) असे आहे.

पाळधी चांदसर येथे रस्त्यालगत असलेल्या वीटभट्टीजवळ सात ते आठ फूट खड्ड्यात एका रखवालदाराला प्रिया आणि जयेशचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. प्रियाजवळ घड्याळ आणि शाळेची बॅग सापडली तर जयेश कडे मोबाइल मिळाला. पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाइकांना घटनास्थळी बोलावून घेतले. ओळख पट्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जयेश नूतन मराठा महाविद्यालयात 12 वीला होता. जयेश 1 ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता होता. त्याने मित्रांना सांगितले की पाळधी येथे जात आहे. जयेशच्या कुटूंबियांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती की तो कुठे गेला आहे.

प्रियाचे वडील दत्तात्रय राजाराम पाटील यांनी तक्रारीवरुन पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिया क्लासला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. परंतू क्लासहून परत आल्यास तिच्या आईने वडिलांना फोन लावून सांगितले. त्यानंतर पुतण्याला सांगून तिच्या वडिलांनी प्रियाचा शोध घेण्यासाठी क्लासमध्ये पाठवले, परंतू ती क्लासला आलीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुलीला कोणीतरी पळवल्याची तक्रार पाटील यांनी पोलिसात दाखल केली. पोलिसांनी पद्मालय आणि इतर ठिकाणी प्रियाचा शोध घेतला परंतू ती कोठेही सापडली नाही.

प्रिया आणि जयेशची होती ओळख –

प्रियाची मावशी जयेशच्या घराजवळ राहत होती. ती नेहमीत तिच्या मावशीकडे येत असत. त्यातूनच दोघांची ओळख झाली होती. प्रियाच्या नातेवाइकांनी नशिराबाद येथे देखील प्रियाचा शोध घेतला. जयेशच्या मित्रांना पाळधी पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

Visit : Policenama.com