युवा कॅप्टन दोषी थापा गलवानमध्ये टँक अपघातात शहीद, यंदा लडाखमध्ये आतापर्यंत 23 सैनिक शहीद

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत चीनमध्ये 29-30 ऑगस्ट रोजी झालेल्या ताज्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर एक वाईट बातमी समोर येत आहे. गलवान घाटीत तैनात असलेले युवा कॅप्टन दीक्षांत थापा एका रस्ते अपघातात शाहिद झाले आहे. कॅप्टन थापाची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा पूर्व लद्दाखमध्ये भारत आणि चीनमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. म्ह्णून जेव्हा ही माहिती सुरुवातीला आली तेव्हा बरेच लोक संभ्रमात पडले की, या संघर्षामध्ये कॅप्टन थापाने आपला जीव गमावला आहे का? पण कॅप्टन एका वेगळ्या अपघातात शाहिद झाले आहेत.

सैन्याच्या 6 पायदळांसह होते तैनात
लष्कराच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, कॅप्टन थापा 6 मॅकेनाइज्ड इन्फंट्रीसह तैनात होते. ही घटना 30 ऑगस्ट रोजी कियारी जवळील कारु येथे घडली. माहितीनुसार, बीएमपी -2 एका टँकवर भरले जात असताना कॅप्टन दीक्षांत थापा अपघातात शाहिद झाले. घटनेत बीएमपी आपल्या जागेवरुन बाजूला होत त्यांच्यावर जाऊन पडला. अपघात इतका मोठा होता की कॅप्टन थापाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गलवानमध्ये आतापर्यंत 23 भारतीय जवान शहीद झाले आहेत. गलवान घाटीत चिनी धमक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याने सध्या बीएमपी -2 सरत तैनात केले आहेत. बीएमपी – 2 ही भारताचे अड्वान्स टॅंक आहे. लोकांनी कॅप्टन दीक्षांत यांच्या शहादतीच्या बातमीला ताज्या घडामोडींशी जोडण्यास सुरवात केली. 15 जूननंतर चीनने 29 ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईनंतर हॅन्ड -टू – हॅन्ड युद्ध झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सैन्याने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार नाकारला आहे.

गलवान घाटीत तैनात बीएमपी
भारताने सरतला दरबुक-श्योक-डीबीओ रोड (डीएसडीबीओ रोड) वर तैनात केले आहे. सरतच्या तैनातीवरून हे स्पष्ट झाले आहे की, सैन्य चीनला प्रत्येक प्रकारे प्रतिउत्तर देण्यास सक्षम आहे आणि पूर्णपणे सतर्क आहे. सध्या चुशूलमधील घटनेत कोणत्याही अधिकारी किंवा सैनिकाला इजा झालेली नाही. सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद म्हणाले की, “29 आणि 30 ऑगस्ट रात्री पीएलएच्या जवानांनी पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान सैन्य आणि मुत्सद्दी चर्चेदरम्यान झालेल्या सहमतीचे उल्लंघन केले आणि चिथावणीखोर लष्करी कारवाया केल्या.” चर्चेद्वारे शांतता व स्थैर्य राखण्यासाठी सैन्य कटीबद्ध आहे, परंतु सोबतच त्याच्या क्षेत्रीय अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी तितकेच दृढ निश्चयी आहोत. ‘