Coronavirus : भारतामध्ये युवकांना जास्त विळख्यात घेतोय ‘कोरोना’ व्हायरस, संक्रमितांमध्ये महिलांचं प्रमाण ‘कमी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरस सर्वात जास्त तरुण वर्ग आणि नोकरी करणाऱ्या जनतेला आपल्या विळख्यात घेत आहे. इंडिया टुडेच्या इंटेलिजन्स युनिट (DIU)ने कोरोना व्हायरसच्या १,८०१ प्रकरणांच्या विश्लेषणाच्या आधारावर हा निष्कर्ष मांडला आहे.

भारतातील जास्तीत जास्त तरुण लोक कोरोना व्हायरसच्या निशाण्यावर असल्याचे आकडेवारी दर्शवित आहे. आतापर्यंतचे 60 टक्के लोक 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

आकडेवारीनुसार, 1,801 पुष्टी झालेल्या प्रकरणांपैकी 391 म्हणजेच 22 टक्के रुग्ण 30 ते 39 वर्षांच्या दरम्यान आहेत. यानंतर 376 म्हणजेच २१ टक्के हे २० ते 29 वर्षांच्या दरम्यान आहेत, तर संक्रमित लोकांपैकी 17 टक्के लोक 40 ते 49 वर्षांच्या दरम्यान आहेत.

यापूर्वी, चीन आणि इटलीसारख्या इतर देशांकडून येणाऱ्या अहवालात असे म्हटले गेले होते की कोरोना विषाणूची लागण जास्तीत जास्त वृद्ध लोकांना होते. परंतु भारतातील एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणांपैकी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील रूग्णांपैकी केवळ 19 टक्के आणि 80वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांपैकी केवळ २ टक्के रुग्ण कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत.

1 एप्रिल पर्यंत 3 टक्के म्हणजेच 46 प्रकरणे नोंदली गेली ज्यात संक्रमित रूग्णाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की आतापर्यंत तरुण लोक असा विचार करीत होते की त्यांना या आजाराचा कमी परिणाम होईल, परंतु ते गंभीर आजारी पडू शकतात, त्यांना प्राणालाही मुकावे लागू शकते.