औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील दादा कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा भागात आज (सोमवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
फिरोज अनीस खान (वय-३२ रा. दादा कॉलनी, कैलासनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिरोज खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तो पोलिसांना टीप देत असल्याचा काहींना संशय होता. यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने फिरोजवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
टोळक्याने फिरोजला दादा कॉलनी येथे एकट्याला गाठून त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
- रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
- गरोदर महिलांच्या ‘या’ सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट
- झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
- हाय ब्लडप्रेशरला करा बायबाय, नाष्ट्यापूर्वी खावेत ३ खजूर, होतील ‘हे’ फायदे
- सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!
- चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
- मूळव्याधीची ‘ही’आहेत ६ कारणे, हे सोपे ११ उपाय केल्यास मिळेल आराम
- अंगावर शहारे का येतात ? शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे
- गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी
- गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या