लग्नानंतर अवघ्या २५ दिवसात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

बंगळूरू : वृत्तसंस्था – लग्नाच्या अवघ्या २५ दिवसांतच एका २५ वर्षीय तरुणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बंगळूरूमध्ये समोर आला आहे.

आर. शंकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

शंकर हा बीबीए ग्रॅज्य़ूएट आहे. तो नुकताच एका बीपीओमध्ये काम करत होता. दरम्यान त्याचे लक्षिथाशी १८ एप्रिल रोजी प्रेमविवाह झाला होता. दोघे हालासुरु येथे राहण्यास होते. दरम्यान पत्नी काही दिवसांतच घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. घर सोडून स्वतंत्र राहण्याचा त्याच्या पत्नीचा आग्रह होता. त्यानंतर तिने त्याचे फोन व मेसेज स्वीकारणे आणि त्याला रिप्लाय देणे बंद केले होते. त्याने रविवारी तिला तू तुझी वर्तणूक बदलली नाहीस आणि घरी परतली नाहीस तर वीष पिऊन आत्महत्या करेन अशी धमकी तिला दिली होती. त्यानंतर काही हरकत नाही. असा मेसेज तिने पाठवविला होता. त्यामुळे त्याने वीष पिऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्याच्या वडीलांनी लक्षिया व इतरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.