आजाराला कंटाळून ‘त्या’ तरुणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – सततच्या आजारपणाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आज(सोमवार दि- १९) सकाळी ७.३० वाजता ही घटना समोर आली. शामकांत भास्कर बारी (वय ३५,) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर तरूण जळगावातील गायत्री नगरातील रहिवासी आहे.

शामकांत बारी हे काही वर्षांपासून सततच्या आजारपणाला खिळलेले होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. परंतु आज(सोमवारी) सकाळी त्यांनी आत्महत्या केली. राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढल्यानंतर त्यांना या अवस्थेत पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर बारी यांचे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूची घोषणा ऐकताच कुटुंबियांना जोराचा धक्का बसला. बारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. इतर नातेवाईकांनी कुटुंबियांना सावरण्यासाठी आधार दिला. त्यांच्या जाण्याने मुलाचे पितृछत्र हरवले आहे.

त्यांच्या अचानक जाण्याने बारी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाय आजाराला कंटाळून अशी आत्महत्या केल्याची घटना प्रथमच समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.