कळंब (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास दसऱ्यातील धुतलेले धुणं वाळत टाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. घरावरील 33 केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून गणेश मधुकर जाधव (वय 28) याचा जागीच मृत्यू झाला. गणेशच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरण विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा यासाठी कळंब पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. गणेश जाधवचा चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून त्याला तीन व दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
महावितरण विरुद्ध गुन्हा दाखल करा
ग्रामस्थांच्या निवेदनाला कवडीची किंमत देत केराच्या टोपलीत टाकणाऱ्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे काही महिन्यांपूर्वी खालिद शिकलकर यांचा जीव गेला. तर आज गणेश मधुकर जाधव याचा जीव गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उफाळला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
Visit : policenama.com
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय