श्रीरामपूरमध्ये 28 वर्षीय तरुणाच्या छातीत गोळी झाडून हत्या

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन असतानाही हिंसाचार्‍याच्या घटना कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. अशाीच एक घटना  श्रीरामपूर शहरातील अशोक नगरमधील जोशी वस्तीवर घडली आहे.   जमिनीच्या वादातून एका तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गणेश साळवे (वय 28 वर्षे) असे ठार झालेल्याचे  नाव आहे.

जागेच्या वादातून आरोपी राजू गांगुर्डे काल रात्राी 25 ते 30 जणांना घेऊन गणेश साळवे याच्या घरी आला. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे टोळक्यने  गणेश साळवे यास बेदम मारहाण केली. राजू गांगूर्डेने  पिस्तूलमधून गणेशवर  गोळी घातली. त्यामुळे गणेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मुख्य आरोपी राजू गांगुर्डे आपल्या साथीदारांसह फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी धाव घेतली. त्यानंतर डीवायएसपी राहुल मदने यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत.  दरम्यान, गणेशचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर त्याठिकाणी रात्री मोठा जमाव जमा झाला होता. यावेळी दवाखाना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.