पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरातील क्रिकेट खेळाडूंच्या तुलनेत क्रिकेट विश्वात रोहित शर्माचे वर्चस्व आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पण एक वेळ अशीही होती जेव्हा रोहितला संघात जागा मिळत नव्हती. भारतीय संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठी रोहितला बराच कालावधी लागला. भारतीय सलामीवीर रोहितने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने अनेक शॉट्समुळे सर्वांना प्रभावित केले होते. मात्र मर्यादित षटकातील फॉर्मेटसाठी संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याला सहा वर्षे लागली.
रोहितला संघात पुन्हा जागा देण्याचे श्रेय 2013मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जाते. दरम्यान, युवराज सिंहने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान रोहित शर्माच्या पदापर्णाच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याच्या फलंदाजीमुळे युवीला रोहितकडे पाहून पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हकची आठवण यायची असेही त्याने सांगितले. रोहित शर्मा जेव्हा संघात आला तेव्हा तो एका दिग्गज खेळाडू सारखा खेळायचा. रोहित जेव्हा फलंदाजी करायचा तेव्हा मला इंझमामची आठवण यायची. गोलंदाजाला मोठे शॉट खेळण्यासाठी इंझमाम खूप वेळ घ्यायचा. रोहित शर्माने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वयाच्या 19 व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले होते, परंतु 2007 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने प्रथम धावा केल्या. जो भारताने जिंकला होता. या वर्षांत तो जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. रोहितने 224 एकदिवसीय सामन्यात 9 हजार 115 धावा केल्या असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.