Bhajan Lal Sharma In Pune | राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले – ‘काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bhajan Lal Sharma In Pune | पुण्यात आलेले राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या देशाने भ्रष्टाचाराची मोठी किंमत मोजली आहे. यापूर्वी देशात भ्रष्टाचाराचे विक्रम झाले होते. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. पण 2014 नंतर त्यावर अंकुश आला. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून देशात अनेक बदल झाले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून देशात विकासाची गंगा वाहत आहे. या काळात देशात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे देशातील जनता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केला.(Bhajan Lal Sharma In Pune)

पुण्यातील (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या समर्थनार्थ प्रवासी राजस्थानी सेलने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भजनलाल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत गेल्या 10 वर्षात देशात खूप काम झाले आहे, असे ते म्हणाले. तरीही अजून बरेच काम करायचे बाकी आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर ही सर्व कामे पूर्ण होतील. त्यामुळे भाजपला प्रत्येक जागेवर विजयी करा. त्यामुळे नरेंद्र मोदींचे हात बळकट होणार आहेत.

शर्मा पुढे म्हणाले की, काँग्रेस गरिबांची चेष्टा करत आहे. चार पिढ्यांपासून ते गरिबी हटवण्याचा दावा करत आहेत. सर्वप्रथम इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला होता. पण गरिबी हटली नाही. त्यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनीही तेच आश्वासन दिले. पण गरिबांची स्थिती बदलली नाही. नंतर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधींनी हाच दावा केला होता, आता राहुल गांधी एका क्षणात गरिबी हटवण्याचा मंत्र देत आहेत. गरिबांची चेष्टा करणे हे या कुटुंबाचे काम आहे. खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचे काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी देशातील 25 कोटी लोकांचे जीवन सुधारले आणि त्यांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले. खरे तर 2014 नंतर गरिबीची व्याख्याच बदलली आहे.

भजनलाल शर्मा म्हणाले की, ज्याचा हेतू आणि धोरणे योग्य असतील तोच देशावर राज्य करेल.
अनेक वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी २१ वे शतक भारताचे असेल असे भाकीत केले होते.
जी नरेंद्र मोदी आज खरी ठरवत आहेत. त्यांनी जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवली.
काँग्रेसच्या काळात आपण आर्थिक बाबतीत 11व्या क्रमांकावर होतो, आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत.
मोदींच्या नेतृत्वाखाली येत्या दोन वर्षांत आपण पहिल्या तीनमध्ये असू.

राजस्थान भवनासाठी प्रयत्न करू

समस्त राजस्थानी समाजाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी पुण्यात भव्य राजस्थान भवन बांधले जावे, त्यासाठी सरकारने येथे
१० एकर जागा द्यावी, अशी मागणी केली. यावर भजनलाल यांनी मुरलीधर यांच्याकडे बोट दाखवत सांगितले की,
संसदेत निवडून आल्यानंतर मोहोळ हा प्रश्न सोडवणारा पहिला असेल.
यावर मुरलीधर यांनी हा राजस्थानी बांधव सदैव भाजपसोबत असल्याची ग्वाही दिली.
अशा स्थितीत जिंकल्यानंतर पहिले काम राजस्थानी भवनासाठी जमीन देण्यासाठी प्रयत्न करू.
जे राजस्थानी बांधव अनेक दिवसांपासून पुण्यात राहतात. त्यांना आपण पुणेकर मानतो, असे ही मोहोळ म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On PM Modi Offer | मोदींच्या ऑफरवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, ”ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच”