भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले ‘कोरोना’चे उपचार, नव्या पध्दतीनं ‘संसर्ग’ रोखता येणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय वैज्ञानिकांनी आता कोरोनावर प्रभावी ठरतील अशी औषधं आणि संभाव्य उपचारांचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या औषधांनी कोरोनाच्या उपचारासाठी मदत होईल. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या लसीकरणाची तयारी तरी सरकारकडून सुरू आहे. परंतु, कमी कालावधीत सगळ्यांनाच लस मिळणं कठीण आहे. काही लाख लोकांनाच लस मिळू शकते. त्यात फ्रंटलाईन व्रर्कर्स, आरोग्यसेवेतील कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.

‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करण्यात आला आहे. हा लेख म्हणजे तामिळनाडुच्या अलगप्पा महाविद्यालय आणि स्वीडनच्या केडीएच रॉयल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधानुसार संशोधकांनी औषधं आणि मिश्रणांची एक सुची तयार केली आहे. ड्रगबँक’ आकड्यांच्या अध्ययनावर आधारीत हा शोध जर्नल ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रकाशित लेखातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस कोणत्या पद्धतीने हल्ला करतो. याबाबत अधिक परिक्षण सुरू आहे.

या संशोधनाचे प्रमुख वैभव श्रीवास्तव आणि अरूल मुरुगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन उपचारपद्धतीमुळे व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी मदत होईल. पुढे ते म्हणाले की, व्हायरस खूप वेगाने आपला प्रसार वाढवत आहे. कारण व्हायरस प्रोटीनमध्ये सतत बदल होत असतो. अशा कोणत्याही औषधामुळे व्हायरसच्या अनेक प्रोटिन्सचा नष्ट करता येऊ शकतं. असे गुण उपलब्ध असतील अशी वेगवेगळी औषध शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकात्कालीन प्रमुख डॉ. माइकल रेयान यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत मृतांचा आकडा वाढत आहे. म्हणूनच लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.

डॉ. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचे एकूण तीन तृतीयांश केसेस अमेरिकेत आहेत. अमेरिकेत माहामारीचा प्रकोप वाढत आहे. अमेरिकेत चांगली आरोग्य प्रणाली आणि अधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. तरिही कमी कालावधीत संक्रमण झाल्याने एक ते दोन लोकांचा मृत्यू होणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, गळाभेट घेणं हा जवळचा संपर्क मानला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या एंजेसीने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा जास्त धोका असलेल्या देशातील लोकांना गळाभेट न घेण्याचे आवाहन केलं आहे. देशात संक्रमणामुळे आतापर्यंत २ लाख ८० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.