Jayant Patil On CM Eknath Shinde | ‘जाहिरातीमुळे डोळे वटारल्याने…’, जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On CM Eknath Shinde | सत्ता टिकण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाहिराती करण्याऐवजी ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. केवळ स्वत:ची लोकप्रियता मोजण्यासाठी राज्यात सर्वेक्षण होत आहे. कोणतीही निवडणूक नसताना तुमची लोकप्रियता जास्त आहे हे सांगण्याची गरज काय, असा सवाल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. निवडणुका घ्या लोकं स्वत:च लोकप्रियता सांगतील, असा टोला जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. (Jayant Patil On CM Eknath Shinde)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे गडचिरोली-चिमुर, अमरावती, वर्धा, रामटेक या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Jayant Patil On CM Eknath Shinde)

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://www.facebook.com/photo?fbid=808443877315949&set=pcb.808444170649253

 

अमरावती लोकसभेची (Amravati Lok Sabha) जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून मागच्या वेळी काही कारणास्तव पक्षाकडून अपक्ष उमेदवाराला पक्ष पुरस्कृत करण्यात आले होते. या भागातील कार्यकर्ते ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. जागा वाटपावर अजून चर्चा होणे बाकी आहे. या बैठकांमधून केवळ कार्यकर्त्यांशी चर्चा करून जागांचा आढावा घेण्याचे काम होत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यात जाहिरातबाजीवरून चर्चा रंगली असून त्याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले,
एकनाथ शिंदे गटाच्या माहित नसलेल्या समर्थकाने काल जाहिरात दिली. त्यामध्ये नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो दाखवण्यात आला. देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांना शिंदेंनी मागे टाकले असे त्या जाहिरातीतून समोर आले.
या जाहिरातीमुळे कोणीतरी डोळे वटारल्याने आज दोन्ही पक्षाची चिन्हं असलेली जाहिरात देण्यात आली असावी,
असा टोला त्यांनी लगावला.

दररोज पानभर जाहिराती करताना राज्यातील सामान्य जनता, इथली दुष्काळी परिस्थिती याविषयी सरकारला
काही वाटत नाही. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर रोज सकाळी याच राज्यकर्त्यांचे दर्शन महाराष्ट्रातील जनतेला
घ्यावे लागत आहे. यामुळे दोन्ही पक्षांतर्गत काही मतभेद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना घाबरवण्याचे काम सुरु आहे का? त्यांनी कशाप्रकारे वागावे याची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली असावीत,
असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. हे सरकार टिकवण्यासाठी दोन्ही घटकांकडून
लवचिकता दाखवण्यात आली आहे. त्यांना महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) भीती आहे.
काही झाले तरी एकत्र राहावे अशी मानसिकता बाळगणारे लोक सर्व प्रकारचा त्याग करून, शरणागती पत्करुन
त्यांचे सरकार टिकवण्याचा प्रयत्न करतील, असा टोमणाही जयंत पाटील यांनी मारला.

Web Title :   Jayant Patil On CM Eknath Shinde | due to advertisement of shivsena in news papers’, Jayant Patal’s taunt to the Chief Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)