खुषखबर! खरीप हंगामातील पिकांचा हमीभाव वाढवण्याचा मोदी सरकारचा निर्णय 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

आता देशातील शेतकऱ्यांसाठी खुषखबर ! मोदी सरकाराने देशातील शेतक-यांसाठी दिलासा देणारा निर्णय आज घेतला आहे. खरीप हंगामातील हमीभाव वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. हंगामातील १४ पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढवण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. धान्याच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात येणार आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी महत्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला. खरीप पिकांची पेरणी मान्सून सोबतच सुरू होते.  सरकारने खरीप पिकांवर एमएसपी २०० रूपयांची वाढ करण्याचे जाहीर केले. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . मागील वर्षी हमीभाव ८० रुपयांनी वाढवला होता.

[amazon_link asins=’B07CB4DF3Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’316a4fae-7f72-11e8-b87b-1503759e1458′]

धान्य- पूर्वीचे वर्षाचे दर – आत्ताचे दर

मका – १४२५ वरून १७००
तूर – ५४५० वरून ५६७५
उडद – ५४०० वरून ५६००
ज्वार – १७२५ वरून २३४०
बाजरी – १४२५ वरून १९५०
मूग – ५५७५ वरून ६९७५
सोयाबीन – ३०५० वरून ३३९९
तीळ – ५३०० वरून ६४२९
सुर्यफूल – ४१०० वरून ५३८८
शेंगदाणे – ४४५० वरून ४८९०
कॉटन मिडीयम स्टेपल – ४०२० – ५१५०
कॉटन लाँग स्टेपल – ४३२० – ५४५०