आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका : रविना टंडन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

देशभरात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कुठे दूध रस्त्यावर ओतले जात आहे,तर कुठे भाजीपाला आडवला जात आहे. या आंदोलना संदर्भात आता आभिनेत्री रविना टंडन भलतीच बरळली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तिने टीका केली आहे. अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि जामीनही देऊ नका, असे रविना टंडनने म्हटले आहे. रविनाने तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन हे ट्वीट केले आहे.

काय म्हणाली रविना ?

” ही अतिशय क्लेशकारक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.”, असे अभिनेत्री रविना टंडन हिने ट्वीट केले आहे.विनाच्या ट्वीटला अनेक जणांनी प्रश्न केले, उत्तर दिले, काहींनी तिच्या विधानाचा प्रतिवादही केला. मात्र तरीही प्रत्येकाला उत्तर देताना रविना टंडनने आपली शेतकरी आंदोलनविरोधी भूमिका सोडली नाही. पण रविनाच्या या ट्विटमुळे तिच्यावर सोशलवर बऱ्याच टीका होत आहेत. खरे पाहता रविना सामाजिक कार्यात भाग घेणारी अभिनेत्री आहे अशी तिची ओळख आहे मात्र आता तिच्या या ट्विट मुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहेत.

श्रीनिधी मिश्रा नामक व्यक्तीने रविनाचा प्रतिवाद करताना म्हटले, “जर शेतकरी सुट्टीवर गेले, तर जग उपाशी राहील आणि मग तुम्हाला खायलाही मिळणार नाही, पर्यायाने तुम्ही असे हे मोफत इंटरनेट वापरण्यासाठी जगूही शकणार नाही.” श्रीनिधी यांच्या ट्वीटला रिप्लाय देताना रविना म्हणाली, “मग तुम्ही काय करताय मोफत इंटरनेट वापरुन? तुम्हीही मोफत इंटरनेट वापरणं बंद करा आणि नासाडीला समर्थन करण्याऐवजी मदतीसाठी विचार करा.”रविनाच्या मूळ ट्वीटवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता दाखवत, त्यांना तुरुंगात डांबण्याची भाषा रविनाने केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागत आहे.