‘या’ कारणामुळे अभिनेत्री अमृता राव ‘चित्रपटसृष्टी’ पासून दूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव इंडस्ट्रीमध्ये मासूम अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये ‘अब के बरस’ चित्रपटातून केली होती. या चित्रपटात अमृता आर्य बब्बर सोबत दिसली होती. मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अमृता राव ‘इश्क विश्क’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेनंतर चर्चेत आली. कॉलेज गर्लची भूमिका अमृताने छान प्रकारे साकारली होती. तिने ‘मैं हूं ना’ आणि ‘विवाह’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

तिने तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. पण तिला तिथे यश मिळाले नाही. सध्या अमृता फॅशन शो करत आहे. अमृता चित्रपटापासून लांब राहण्याचे मुख्य कारण म्हणजे इंटीमेट सीन. तिने आत्तापर्यंत कोणत्याच चित्रपटात इंटीमेट सीन दिला नाही. यामुळे अनेक मोठ्या चित्रपटात काम करण्यास तिने नकार दिला.

https://www.instagram.com/p/Bxtwnifnt2R/?utm_source=ig_embed

याबाबत बोलताना अमृता म्हणाली की, हा प्रश्न तुम्ही चित्रपट निर्देशक सूरज ब़डजात्या आणि सलमान खानला विचारला पाहिजे. हि बातमी खरी नाही जर मला सलमान खानच्या बहिणीचा रोल मिळाला तरी मी करेन. सूरज ब़डजात्या आणि माझ्या परिवाराचे नाते खूप जवळीक आहे. अशा प्रकारच्या अफवा ऐकल्यावर मला खूप वाईट वाटले.

अमृता पुढे म्हणाली की, ‘इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी गॉडफादर नाही ना कोणता सुपस्टार माझा बॉयफ्रेंड आहे जो मला सपोर्ट करेल. मी २०१० मध्ये अमिताभ बच्चन, तब्बू आणि अर्जुन रामपाल यांच्या सोबत एक मोठा साइन केला होता. चित्रपटासाठी मला पुर्ण फी मिळाली होती. पण काही कारणामुळे हा चित्रपट बनू शकला नाही. ती माझ्या करिअरची सगळ्यात वाइट वेळ होती. ‘

अमृताने ७ वर्ष आरजे अनमोल बरोबर डेट केल्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले. नंतर ती चित्रपटसृष्टीतून लांब गेली. ६ वर्षानंतर अमृता ‘ठाकरे’ चित्रपटात दिसून आली. आता ती वैवाहिक जीवन जगत आहे. त्याचबरोबर अमृता प्रोडक्शन ही ट्राय करत आहे.