PM Modi Sabha In Pune | पुण्यभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुतीसुमने, म्हणाले – ‘या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्यासारखे संत सुधारक…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi Sabha In Pune | या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्राचे तज्ज्ञ उपस्थित आहेत. त्यामुळेच म्हणतात पुणे तिथे काय उणे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याची स्तुती केली. ते महायुतीचे (Mahayuti Candidate) पुण्यातील लोकसभेचे (Pune Lok Sabha) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि इतर तीन उमेदवारांसाठी रेसकोर्स येथे आयोजित सभेत बोलत होते.(PM Modi Sabha In Pune)

पंतप्रधान नरेंद्र म्हणाले, काँग्रेसने देशात साठ वर्ष राज्य केले. पण काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील अध्र्यापेक्षा जास्त जनतेकडे मुलभूत सुविधा नव्हत्या. आम्हाला तर आता फक्त दहा वर्षे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पण या दहा वर्षात आम्ही मुलभूत गरजा पुर्ण केल्या, सोबतच प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करायला जीव ओतून काम केले. आवश्यकता आणि आकांक्षा दोन्हींच्या पूर्ततेसाठी एक व्हिजन घेऊन पुढे जात आहोत.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, शहरात राहा, किंवा गावात, चांगले रस्ते बघून, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बघून मन प्रसन्न होते. मेहनत तुम्हालाही करावी लागेल. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरने आपल्याला विश्वास निर्माण होतो. इथे पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळाचे पालटलेले नवे रुप पाहा, पालखी मार्ग पाहा, समृद्धी महामार्ग बघा, प्रत्येक जागेला कनेक्ट करणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन बघा, हे सर्व आधुनिक होणाऱ्या भारताची प्रतिमा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पुण्यातील मतदारांना आश्वासन देताना मोदी म्हणाले, पुणेकरांनो लिहून घ्या, ही मोदीची गॅरंटी आहे, तो दिवस येणारच आहे, जेव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनने प्रवास करणार.

काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, डॉ. मनमोहन सिंह यांचे जे रिमोटवाले सरकार होते
त्या सरकारने १० वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला तेवढा खर्च आम्ही १ वर्षात करतो.
आजचा भारत आपल्या युवकांचे संशोधन, टॅलेंट आणि टेक्नॉलिजवर विश्वास ठेवून पुढे जात आहे.

मोदी पुढे म्हणाले, स्टार्टअप इंडियाची कमाल पाहा, फक्त १० वर्षात भारतीय युवकांनी सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहेत. गर्वाची बाब म्हणजे यापैकी अनेक हे आपल्या पुण्यातील तरुण आहेत.

मोदीजी म्हणाले, आम्ही जे नीतीनुसार बदल केले आहेत त्याचा परिणाम मॅपिंगच्या क्षेत्रात बघायला मिळत आहेत.
माझ्या देशाचे तरुण त्यात पुढे जात आहेत. अवकाश, सुरक्षा विभाग, उद्योग अशा विविध विभागात प्रगती सुरु आहे.
पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत. आम्ही १ लाख कोटी रुपये, जे लोक इनोवेशन करु इच्छितो, त्यांना डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे. देश जगातही आपली चमक दाखवत आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी सरकारचे दहा वर्षातील काम सांगताना मोदी म्हणाले, दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागत होते.
आता भारत जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे.
मेड इन इंडिया चिप्सने जगातल्या गाड्या चालताना दिसतील आणि माझे पुणे शहर तर ऑटोमोबाईल हब आहे.
आता आम्ही भारताला इलेक्ट्रिक वेहिकल हब बनताना बघू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपचा संकल्प हा भारताला सेमी कंडक्टर हब, इनोवेशन हबमध्ये बनवण्याचा आहे.
भारतात हायड्रोजन हब बनवण्याचा संकल्प आहे.
हे आमचे पहिले असे सरकार आहे ज्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला आहे,
असे मोदी म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती