Video : ‘राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावीत : खा. प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर ( MP Pragya Singh Thakur) यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटले तर वाईट वाटत नाही. मात्र शुद्राला शुद्र म्हटले, तर वाईट वाटते. कारण काय आहे, समजत नाही, असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घालावीत, क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार? असे वादग्रस्त विधान खा. ठाकूर यांनी केले आहे.

मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये एका कार्यक्रमात खा. ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुले जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार? असे खा. ठाकूर यांनी म्हटले आहे. भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या घटनेवरून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज येणार आहे. आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यानेच ममता बॅनर्जी हताश झाल्या असल्याचे त्या म्हणाल्या.