Bigg Boss 13 : ‘या’वेळी रश्मी देसाई करू शकते घरात लग्न, असं करणारी 3 री अभिनेत्री बनणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस सीझन 13 च्या सतत बातम्या समोर येत आहेत. टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई विषयी असे सांगण्यात येत आहे की, ती ही यावेळी बिग बॉसचा भाग होऊ शकते. विशेष म्हणजे शोमध्ये तिचा प्रियकर अरहान खानसोबत रश्मीची चर्चा जोरात सुरू आहे. रश्मी देसाई तिचा प्रियकर अरहान खानसोबत बिग बॉस -13 मध्ये भाग घेणार असल्याचे म्हटले जाते. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रश्मी बिग बॉसच्या घरात अरहानशी लग्न करू शकते.
https://www.instagram.com/p/BxB3TedgR3Z/
एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, ‘उतरन’, ‘दिल से दिल तक’ आणि ‘नागीन 3’ सारख्या कार्यक्रमात काम करणारी रश्मी देसाई बिग बॉस सीझन -13 मधील सर्वात मोठी धमाकेदार कामगिरी करू शकते. या शोमध्ये बॉयफ्रेंड अरहानशी लग्न केल्याची चर्चा समोर येत आहे. पूर्वी बिग बॉसच्या घरात रिअल लाइफ वेडिंग्स झाली. टीव्ही अभिनेत्री सारा खानने अली मर्चंटशी लग्न केले होते, तर भोजपुरी अभिनेत्री मोनालिसानेही बिग बॉसच्या घरात आपला लॉन्ग टाइम प्रियकर विक्रांतसिंग राजपूतसोबत सात फेरे घेतले होते. बिग बॉसमधून बाहेर येताच सारा आणि अली विभक्त झाले होते, परंतु मोनालिसा आणि विक्रांत अजूनही आनंदाने त्यांचे वैवाहिक जीवन जगत आहेत.
आता रश्मी देसाई आणि अरहान खानने सीझन 13 मध्ये लग्न केले तर हे या सीजनमध्ये सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. कारण रिअॅलिटी शोज मध्ये खऱ्या लग्नांना नेहमीच चांगले प्रेक्षक आणि टीआरपी मिळते.
रश्मीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे म्हणले तर तिने प्रथम टीव्ही अभिनेता नंदीश संधूशी 2012 मध्ये लग्न केले होते. परस्पर संमतीने या जोडप्याने 2015 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटासाठी रश्मीने नंदिशच्या कॅसोनोवा नेचरला दोष दिला. त्याचबरोबर नंदिश म्हणाला की, रश्मीच्या सकारात्मक स्वभावामुळे समस्या आल्या आहेत.
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा