Shiv Sena MP Sanjay Raut | अशा पद्धतीने ते २०० पार सुद्धा जाणार नाहीत, संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

ADV

मुंबई : Shiv Sena MP Sanjay Raut | सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून ४०० पार उडी मारता येईल असे भाजपाला (BJP) वाटते. परंतु, अशा पद्धतीने ते २०० पार सुद्धा जाणार नाहीत. कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा? असे विचारायची परिस्थिती आहे. असेच चालत राहिले तर मोदींना देशात तोंड लपवून फिरावे लागेल, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपा (Ashok Chavan to Join BJP) प्रवेशानंतर केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, काँग्रेसबरोबर थेट युती करणे टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सर्व पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे.

ADV

राऊत पुढे म्हणाले, भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे.
कारण त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात घेऊन शुद्धीकरण
मोहीम चालवली आहे. महात्मा गांधींचे काँग्रेस शुद्धीकरणाचे स्वप्न भाजपाने स्वीकारले आहे.

संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारने ज्याप्रमाणे एक एक नेत्याच्या मागे शुक्लकाष्ट लावले आहे, ज्या वेगवेगळ्या
चौकशा लावल्या आहेत, त्यामुळे तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी तात्पुरते का होईना भाजपावासी झालेले परवडेल
अशी मन:स्थिती सर्वांची झालेली आहे. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपावर
कोणताही परिणाम होणार नाही, असे राऊत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत