‘OBC बांधवांनी उचलला आपल्या न्याय हक्काचा विडा, जातनिहाय जनगणना नाही तो पर्यंत माघार नाही’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन – ओबीसी जनगणना झाली पाहिजे या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी,मुरबाड,शहापूर,कल्याण,अंबरनाथ,भिवंडी, वाडा,कर्जत तालुक्यांसह महाराष्ट्रातील विविध तालुक्यात मोठया संख्येने ओबीसी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी  ओबीसी जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत माघार नाही. आपले हक्क मिळवण्याचा विढा उचलला आहे.

ओबीसी समाजाची 2021 ला ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे,अन्यथा पुढील येणारी जनगणना आम्ही करणार नाहीत असा इशारा राज्य शासनाला दिला असून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसीची जनगणना ही झालीच पाहिजे ओबीसींची जनगणना ही जाणीव पूर्वक करत नसल्याचे समोर येत असल्याने आता ओबीसी जोपर्यंत जात जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत माघार नाही मुरबाड तालुक्यातील विविध गाव पाडया मध्ये ओबीसी जनजागृती मोहीम राबवून महत्व पटवून देण्यात आले मुरबाड,शहापूर तालुक्यात तब्बल 79 सभा करण्यात आल्या.

ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण जनजागृती सभा म्हसोबा देवस्थान हॉल म्हसा येथे आयोजन केले होते या वेळी युवा प्रभोधनकार सचिव ओबीसी समिती रायगड रोशन पाटील यांनी ओबीसी संदर्भात महत्व पटवून दिले या वेळी कुणबी समाज उन्नती मंडळ मुरबाड अध्यक्ष शांताराम बांगर,माजी अध्यक्ष गणपत विशे तात्या, सरचिटणीस पी एस पवार,माजी पंचायत समिती सदस्य परशराम भोईर,जिल्हापरिषद सदस्य रेखा कंटे,शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,अप्पा घुडे,तालुका ओबीसी संघर्ष समिती संघटक उमेश पाटील यांसह तालुक्यातील जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित होता.