डोक्यात हवा गेल्याने मनसेचं नुकसान : बाळा नांदगावकर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन
मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात हवा गेली आणि त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. लोकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख ढासळला, अशी कबुली माजी आमदार आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

शेतकरी आणि ग्रामीण समस्यांकडं दुर्लक्ष झाल्याचंहीनांदगावकर यांनी मान्य केले. अहमदनगरला ते मनसेच्या आढावा बैठकीत बोलत होते.“पक्ष स्थापनेनंतर मनसेचा आलेख वाढला. मात्र आलेख वाढल्यानं कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. लोकांच्या विश्वासाला पात्र न झाल्याने आमचा आलेख ढासळला. त्यामुळे अलेख हळूहळू वाढला आसता तर बरं झाले असते. असे नांदगावकर म्हणाले. राज्यात सध्या तरी आमची ‘एकला चलो’ ची भूमिका आहे. भविष्यात नेमकं काय होईल, हे सांगता येत नसल्याचं नांदगावकर म्हणाले.