‘मला संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले’ प्रविण तोगडीयांचा विहिंपला राम-राम

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

विहिंपच्या अध्यक्षपद निवडीवरून मतभेद निर्माण झाल्यानंतर निवडणुक घेऊन अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला. या निवडणूकीत १९२ पैकी ६० मते तोगडीया गटाला (राघव रेड्डी) पडली. तर, उर्वरीत सर्व मते तोगडीया विरोधी गटाला (राघव रेड्डी – १३१ मते) पडली. त्यानंतर अनेक वर्ष विहिंपचा चेहरा असलेले तोगडीया यांनी नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देत विहिंपला राम राम ठोकला.

३२ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या तोगडीया यांनी विहिंपमधून बाहेर पडताना आपण विहिंप बाहेर राहून हिंदूंच्या हक्कांसाठी लडाई लढणार असल्याचे म्हटले तसेच, आपल्याला संघटना सोडण्यासाठी मजबूर बनवल्याचेही तोगडीया यांनी म्हटले आहेत.

पुढे बोलताना तोगडीया म्हणाले , ‘आपला उद्देश हा राम मंदिर निर्माण करणे तसेच, त्यासाठी संसदेत कायदा बनविणे हा आहे. हा कायदा आपण बनविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. आपण हिंदूंच्या हक्कांसाठी आणि राम मंदिरासाठी आवाज उठवल्यामुळे काही सत्तांध लोकांनी सत्तेने मदमस्त होत संघटना सोडण्यासाठी आपल्याला मजबूर केल्याचाही आरोप तोगडीया यांनी केला आहे.