ऐश्वर्या राय अशी झाली ‘बच्चन’ कुटूंबाची ‘सुन’, अभिषेकनं ‘असं’ पसंत केलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लग्नला 12 वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांना आराध्या नावाची 8 वर्षांची मुलगी आहे. आज(दि 5 फेब्रुवारी) अभिषेक आपला 44 वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, ऐश्वर्या अभिषेकच्या लव स्टोरीला सुरुवात कशी झाली. अ‍ॅश आणि अभिषेकच्या लग्नानंतर अनेकांना प्रश्न पडला होता की, तिनं अभिषेकला कसं पसंत केलं.

चित्रपटात केलं एकत्र काम
अभिषेक आणि ऐश्वर्यानं ढाई अक्षर प्रेम के आणि कुछ ना कहो या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. तेव्हा त्यांच्या फक्त मैत्री होती. प्यार हो गया (1997) या सिनेमाच्या सेटवर दोघे भेटले होते. अ‍ॅश आधी सलमान सोबत तर नंतर विवेकसोबत रिलेशशिपमध्ये होती. अभिषेक करिश्मा कपूरसोबत एंगेज्ड होता. त्यांचं लग्नही होणार होतं. साखरपुडाही झाला होता.

जिथे प्रपोज करण्याचा विचार केला तिथेच केलं अ‍ॅशला प्रपोज
अभिषेकनं एका मुलाखतीत सांगितलं की, “मी एकदा न्यूयॉर्कमध्ये एका सिनेमाची शुटींग करत होतो. त्यावेळी हॉटेलच्या रुमच्या एका बाल्कनीत उभा होता आणि मी विचार केला की, जर मी ऐश्वर्या सोबत लग्न केलं तर किती छान होईल. काही वर्षांनंतर गुरु सिनेमाच्या प्रीमियरनंतर आम्ही त्याच हॉटेलमध्ये गेलो होतो. त्याच बाल्कनीत मी अ‍ॅशला लग्नासाठी प्रपोज केलं.” अ‍ॅशनं प्रोपजल स्विकारलं आणि 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं.

लग्नात होती मोठी अडचण
लग्नाच्या आधी अ‍ॅश आणि अभिषेक यांच्या लग्नासाठी अडचण होती एक म्हणजे अ‍ॅशच्या कुंडलीतील दोष. हा दोष दूर करण्यासाठी अ‍ॅशला एका झाडाशी लग्न करायचं होतं. दुसरी अडचण अशी की, धूम 2 सिनेमातील अ‍ॅश आणि ऋतिक रोशनचे किसिंग सीन. असं म्हटलं जात आहे की, अ‍ॅशचं हे बोल्ड सीन देणं बच्चन कुटुंबियांना आवडलं नाही. इतकेच नाही तर अ‍ॅशच्या भूतकाळातील सलमानसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. परंतु अभिषेकला भूतकाळाशी देणं घेणं नव्हतं त्यानं अ‍ॅशला थेट लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 16 नोव्हेंबर 2011 रोजी अ‍ॅशनं मुलीला जन्म दिला.