Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या राय हिच्या लग्नातील लाखो रुपयांच्या कांजीवरम साडीची आजही चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेली अभिनेत्री अर्थात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही नेहमी लाइमलाईटमध्ये असते. अनेक दशके ऐश्वर्याने बॉलीवुडवर अधिराज्य केले असून तिच्या अदांनी व सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. आजही ऐश्वर्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) ही नेहमी तिच्या हटके फॅशनने लक्षवेधी ठरते. पण सध्या तिच्या लग्नाच्या साडीची (Aishwarya Wedding Saree) चर्चा रंगली आहे. तिची लग्नाची साडी लाखो रुपयांची असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर आता तिच्या लग्नाची साडी डिझाइन केलेल्या डिझायनरने याबाबत मत मांडले आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 2007 साली अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्नगाठ (Aishwarya And Abhishek Bachchan Wedding) बांधली. तिच्या या लग्नांची खूप चर्चा तेव्हा झाली होती. ऐश्वर्या राय ही बच्चन घराण्याची सून झाल्याने चाहते देखील आनंदीत होते. लग्नावेळी ऐश्वर्याने सुंदर कांजीवरम साडी व हेव्ही ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या साडीची व दागिन्यांची खूप वाह वाह झाली होती. तिचा वेडिंग लूक (Aishwarya Rai Wedding Look) 2007 साली सुद्धा खूप गाजला होता. तिचा हा लूक प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला (Designer Neeta Lulla) हीने डिझाईन केला होता. अनेक वेळा तिची ही लग्नातील कांजीवरम साडी (Kanjeevaram saree) साधारण 75 लाखांची असेल असे अंदाज लावण्यात येत होते. यावर आता डिझायनर नीता लुल्ला यांनी त्यांचे मत सांगितले आहे.

एका मुलाखती दरम्यान नीता यांना ऐश्वर्याच्या लग्नातील डिझायनर साडी आणि त्यावर करण्यात आलेली कलाकुसर याबद्दल विचारण्यात आले.
तेव्हा त्या म्हणाल्या की, “तूम्हीच आता गणित करा. म्हणजे एका कांजीवरम साडीला किती खर्च येईल?
त्यासाठी एक कोटी किंवा 75 लाख रुपये खर्च होऊ शकत नाही का? चांगला कट केलेला, उत्तम प्रकारे फिट केलेला
एम्ब्रॉयडरी केलेला जरदोसी ब्लाउज आणि दागिन्यांसह एक बेसिक ब्लाउज. म्हणजे तुम्ही लग्नाच्या पोशाखात दागिने मोजता ना? ह्यात गणित कुठे आहे माहीत नाही.” असे मत डिझायनर नीता लुल्ला यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांना एका माजी मिस वर्ल्डच्या लग्नाच्या पोशाखाची किंमत विचारण्यात आली तेव्हा तिने ‘मला आठवत नाही’ असे म्हणत नम्रपणे नकार दिला.

अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) व अभिषेक बच्चन यांचा विवाह 20 एप्रिल 2007 रोजी झाला होता.
आता त्यांच्या लग्नाला 16 वर्षे होऊन गेली आहेत तरी अजूनही ऐश्वर्याच्या लग्नाची व तिच्या डिझायनर साडीची चर्चा
केली जात आहे. अभिषेक व ऐश्वर्या यांना मुलगी असून आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) आता 12 वर्षांची आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा