बिल गेट्स यांच्या वक्तव्याने भारताला झटका, कुणालाही नव्हती अशी अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संपूर्ण जग कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. या कठीण काळात सध्या व्हॅक्सीनलाच या जीवघेण्या व्हायरसपासून वाचवण्याचा परिणामकारक उपाय मानले जात आहे. परंतु, या दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील टॉपचे बिझनेसमन बिल गेट्स या गोष्टीवरून टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत की, विकसनशील देशांसोबत लसीचा फार्म्युला सामायिक केला नाही पाहिजे.

प्रत्यक्षात, स्काय न्यूजसोबतच्या मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांना विचारण्यात आले की, व्हॅक्सीनवरील इंटॅलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटची सुरक्षा हटवली गेली आणि ती जगातील देशांसोबत फार्म्युला सामायिक केला गेला तर यामुळे सर्वांपर्यंत लस पोहचण्यास मदत मिळेल का?

अमेरिकन फॅक्टरी आणि भारतील फॅक्टरी यात अंतर
यावर बिल गेट्स यांनी सहजपणे म्हटले, ’नाही.’ त्यांनी म्हटले, जगात व्हॅक्सीन बनवणार्‍या अनेक फॅक्टरी आहेत आणि लोक लसीच्या सुरक्षेबाबत खुपच गंभीर आहेत. तरीसुद्धा औषधाचा फॉर्म्युला सामायिक करू नये. अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सनची फॅक्टरी आणि भारताच्या फॅक्टरीत अंतर आहे. व्हॅक्सीन आम्ही आमच्या पैशाने आणि तज्ज्ञांकडून बनवतो.

बिल गेट्स यांनी पुढे म्हटले की, व्हॅक्सीनचा फॉर्म्युला रेसिपीप्रमाणे नाही की तो कुणासोबतही सामायिक केला जाऊ शकतो. आणि हे केवळ बौद्धिक संपत्तीचे प्रकरण आहे. ही व्हॅक्सीन बनवण्यात खुप सावधगिरी बाळगावी लागते, टेस्टिंग करावी लागते, तिची ट्रायल व्हावी लागते. व्हॅक्सीन बनवताना प्रत्येक वस्तू खुप सावधगिरीने पहावी आणि तपासावी लागते.

बिल गेट्स एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे म्हटले की, यामध्ये हैराण होण्याची बाब नाही की, श्रीमंत देशांनी लसीसाठी अगोदर स्वताला प्राथमिकता दिली. ही गोष्ट खरी आहे की, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 30 वर्ष वयोगातील लोकांना सुद्धा व्हॅक्सीन दिली जात आहे. परंतु ब्राझील आणि दक्षिण अफ्रीकेत 60 वर्ष वाल्यांना अजून लस मिळत नाही. हे चुकीचे आहे. गंभीर कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या देशांना दोन-तीन महिन्यात व्हॅक्सीन मिळेल. बिल गेट्स यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की, एकदा विकसित देशांमध्ये व्हॅक्सीनेशन पूर्ण झाले तर गरीब देशांनासुद्धा लस पुरवली जाईल.

बिल गेट्स यांच्यावर या वक्तव्यामुळे मोठी टीका होत आहे. ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ असेक्समध्ये लॉ च्या प्रोफेसर तारा वान हो यांनी ट्विट केले की, बिल गेट्स म्हणत आहेत की, भारतात लोकांचा मृत्यू रोखला जाऊ शकत नाही. पश्चिम कधी मदत करेल? वास्तवात अमेरिका आणि ब्रिटनने (इंटॅलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्याद्वारे) विकसनशील देशांची मान दाबली आहे. हे खुप घृणास्पद आहे. याशिवाय ग्लोबल जस्टिस नाऊचे संचालक निक डेयर्डन, पत्रकार स्टीफन बर्नी यांच्यासह अनेकांनी टीका केली आहे.