आदित्य नारायण लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये झाला होता खूपच इमोशनल, डोळ्यांतही आलं होतं पाणी ! स्वत:च सांगितलं कारण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा सिंगर आणि इंडियन आयडल 12 चा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आदित्य वाजतगाजत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी उदित यांच्या वाढदिवशी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी लग्न केलं आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्नानंतर खुद्द आदित्यनंच एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे. लग्नाच्या फंक्शन्सदरम्यान आदित्य खूप इमोशनल झाला होता आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, असं त्यानं सांगितलं आहे.

मुलाखतीत बोलताना आदित्य म्हणाला, मी लग्नात सर्वांचं सादरीकरण पाहून खूप इमोशनल झालो होतो. कारण मी कोणालाही रिहर्सल करताना पाहिलं नव्हतं.

पुढं बोलताना आदित्य म्हणाला, लग्नात सर्वांचं सादरीकरण माझ्यासाठी एक सरप्राइझ होतं जे पाहिल्यानंतर मी खूप चकित आणि इमोशनल झालो होतो. माझ्या पालकांनीही माझ्या लग्नता डान्स् केला. हे पाहिल्यानंतर मी खूप इमोशनल झालो आणि माझ्या डोळ्यांत पाणी आलं. परंतु मी कुणाला माझ्या भावना नाही दाखवल्या.