Diljit Dosanjh vs Kangana Ranaut : कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलजीतचा ‘पलटवार’ ! म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच ॲक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अलीकडेच तिनं ॲक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि बॉलिवूड ॲक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता दिलजीतनं प्रतिक्रिया दिली आहे. थोडी तरी लाज बाळग असं तो म्हणाला आहे. कंगना आणि दिलजीत यांच्यातील सोशल वॉर काही केल्या संपताना दिसत नाही.

दिलजीतनं ट्विट करत लिहिलं की, गायब होण्याची शंका दूर कर. तुला हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला की, कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही आहे. तू कुठली अधिकारी आहे ? तुला काही लाज वाटते का ? शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणतेस.

काय म्हणाली होती कंगना ?
कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांना भडकवल्यानंतर दिलजीत आणि प्रियंका चोपडा गायब झाले आहेत. कंगनानं यासंदर्भात ट्विट केलं होतं.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.