कंगना रणौतचा पुन्हा एकदा दिलजीत दोसांझ आणि प्रियंका चोपडावर निशाणा ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. शेतकरी आंदोलनावरील कंगनाच्या वक्तव्यानंतर अनेक पंजाबी सेलेब्सनं तिच्यावर टीका केली. अनेक दिवसांपासून अ‍ॅक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि कंगना यांच्यात यावरून ट्विटरवर घमासान सुरू होतं. यानंतर आता पुन्हा एकदा कंगनानं दिलजीत दोसांझवर टीका केली आहे. परंतु यावेळी तिनं एकट्या सिंगरवरच नाही तर बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिच्यावरही निशाणा साधला आहे.

कंगनानं तिन्ही कृषी कायद्यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ट्विटनं तिनं दिलजीत आणि प्रियंका यांना कृषी कायदा समजावण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असं तिचं म्हणणं आहे.

कंगनानं ट्विट करत लिहिलं की, मोठी अडचण ही आहे की, जास्तीत जास्त लोक हे शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आहेत आणि कायद्यांचा विरोध करत आहेत. ही गोष्ट सर्वांना माहित आहे की, हे कायदे शेतकऱ्यांसाठी किती गरजेचे आहेत. परंतु असं असतानाही त्यांना भडकवलं जात आहे. तिरस्कार पसरवला जात आहे. फायद्यासाठी भारत बंद केला जात आहे.

आणखी एका ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल दिलजीत आणि प्रियंका यांचं लेफ्ट मीडियाकडून कौतुक केलं जाईल. भारत विरोधी इंडस्ट्री त्यांना ऑफर देईल. हा चक्र असंच सुरू राहिल.