Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकार (Modi Government) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. भाजपचे हिंदुत्व (Hindutva) दुतोंडी आसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आगामी काळात सत्तेसाठी चंद्रयान (Chandrayaan), राम मंदिराचा (Ram mandir) मुद्दा समोर आणतील, मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांना नेऊन दंगली घडवतील, असे भाजपचेच सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) व खासदार महुआ मोईत्रा (MP Mahua Moitra) यांनी म्हटले. निवडणुकीसाठी पुलवामा (Pulwama Surgical Strike) घडला होता, तेव्हा सावध रहा असे उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्र दिले आहे. उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट, पक्ष संपल्यापासून मानसिक संतुलन बिघडलंय, अशा शब्दात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटर अकाउंटवरुन उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट. उद्धव जी, तुम्हाला नेमका कशाचा राग आहे, तुम्ही जम्मू काश्मीर कलम 370 (Jammu and Kashmir Article 370) हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे. आपली आता अर्थव्यवस्था (Economy) मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे. भारताची किर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे. उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदीजी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) रात्रंदिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे.

उद्धवजी मी मागील वेळेस तुमच्या जळजळीवर बरनोल पाठवलं होतं पण आता कळतंय की त्याचा
काही उपयोग नाही. कारण तुमची जळजळ ही मानसिक आहे. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय….काळजी घ्या उद्धवजी …, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.

सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या…

भाजपचे नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी देखील ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
उपाध्ये म्हणाले, सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उद्गार आहेत! उद्धव जी,
आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे एक बरं झालं! मतदार विचारत नाहीत,
साथीदार साथ देत नाहीत अशा अवस्थेत तुमचा तोल ढळला आहे. एखाद्या मानसोपचारतज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल असे वाटते. बघा तुमच्याकडे कोणी मिळते का?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात