सेल्फीची हौस आली अंगलट; नदीत बुडून दोघांचा मृत्यू 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन 
‘सेल्फी’ काढण्याची हौस एवढी वाढली आहे की त्या नादात आपण कुठे आहोत हे विसरून छायाचित्र काढणे पाच तरुणांच्या जीवावर चांगलेच बेतले आहे . यवतमाळमध्ये पैनगंगा नदीत सेल्फी काढण्याची हौस तरुणांच्या चांगलीच अंगलट आली. सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटून दोघा अल्पवयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तर तिघा युवकांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे.
तेलंगणातील आदिलाबादमध्ये राहणारे पाच युवक मोहरम निमित्त झरी तालुक्यातील राजूरमध्ये आले होते. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सर्व जण पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले. दुर्घटनेतील सर्व जण तेलंगणातील आदिलाबदचे रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंब दरवर्षी मोहरम सणानिमित्त राजुरला येतं.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e956e27-bcd2-11e8-b3e7-2b80a1c5a8d6′]
नदीत बोट पाहून सर्वांना तिच्यात बसण्याची आणि सेल्फी काढण्याची इच्छा झाली. मात्र सेल्फी काढताना तोल जाऊन होडी उलटली आणि पाचही जण पाण्यात पडले. यातील दोघांना पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . तिघांना पोहता येत असल्याने ते वाचले ; मात्र त्यातील एकाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होत मात्र त्यातील दोघांचा आधीच मृत्यू झाला होता.