या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, सध्याचे सरकार हे सुडाचे राजकारण करीत आहे. आता पाच राज्यातून ते हद्दपार झाले असून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्य व देशातून ते हद्दपार होतील. राज्य सरकार आता शेतकारी कर्जमाफीचा विचार करीत आहे. तीन राज्यातील सत्ता गेल्या नंतर त्यांना हे शहाणपण सुचले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या वाढत्या दौ-याबाबत विचारले असता ते म्हणाले, देशमुख, मी किंवा राष्ट्रवादीतील पदाधिकारी हे विजयदादांसाठीच काम करीत आहोत. राज्यात व देशात सत्तांत्तर घडवायचे असेल तर हक्काच्या जागा गमवून चालणार नाही. पवार साहेब दिल्ली ते गल्लीतील राजकारण चांगले ओळखतात. त्यांना कोणाला कुठे उमेदवारी द्यायची हे समजते, असे भुजबळ म्हणाले.