फायद्याची गोष्ट ! फक्त 20 हजारांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यावसाय, घर बसल्या होईल लाखोंची कमाई, सरकार देईल निम्मे पैसे, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – बोन्साई प्लांट (Bonsai Plant) ही एक अशी वनस्पती आहे जी आजकाल लोकांचे गुडलक मानले जाते, परंतु आपणास माहीत आहे का की, या वनस्पतीद्वारे आपण चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, या वनस्पतीची लागवड कशी करू शकता आणि यासाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील. आजकाल सजावट आणि गुडलक व्यतिरिक्त, या वनस्पतीचा उपयोग ज्योतिष, आर्किटेक्चरसाठीदेखील केला जाऊ शकतो. या शेतीसाठी केंद्र सरकार आर्थिक साह्यदेखील करते.

आपण हा व्यवसाय 20 हजार रुपयांमध्येदेखील सुरू करू शकता, सुरुवातीला आपण आपल्या गरजेनुसार, लहान किंवा मोठ्या स्तरावर प्रारंभ करू शकता. यानंतर, जेव्हा नफा आणि विक्री वाढेल तेव्हा आपण व्यवसायाचा आकार वाढवू शकता.

या वनस्पतीची किंमत किती आहे?
आजकाल हे मोठ्या प्रमाणात भाग्यवान वनस्पती म्हणून वापरली जाते. हे घर आणि ऑफिसमध्ये सजावट करण्यासाठीदेखील वापरले जाते. यामुळे, आजकाल त्यांची मागणी खूप जास्त आहे. आजकाल बाजारात या वनस्पतींची किंमत 200 ते 2500 रुपयांपर्यंत असू शकते. याशिवाय बोन्साई प्लांटची आवड असणारे लोक त्याची हवी तेवढी किंमत देण्यास तयार असतात.

आपण दोन पद्धतीने व्यवसाय करू शकता
प्रथम आपण हा व्यवसाय अगदी कमी भांडवलासह सुरू करू शकता. परंतु आपल्याला थोडा वेळ लागेल. कारण बोन्साई वनस्पती तयार होण्यास किमान दोन ते पाच वर्षे लागतात. याशिवाय आपण तयार झाडे आणू शकता आणि 30 ते 50 टक्के अधिक दराने विक्री करू शकता.

कोणत्या वस्तूंची आवश्यकता असेल
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी, रेतीसारखी माती किंवा वाळू, काचेची भांडी, ग्राउंड किंवा छप्पर, 100 ते 150 चौरस फूट, स्वच्छ गारगोटी किंवा काचेच्या गोळ्या, टॅपर्ड वायर, फवारणीची बाटली झाडावर पाणी शिंपडण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू केला, तर सुमारे 5 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. त्याच वेळी, जर आपण या प्रमाणात थोडीशी वाढ केली तर यासाठी 20 हजारांपर्यंत खर्च होईल.

सरकार करेल इतकी मदत
तीन वर्षांत प्रत्येक रोपासाठी सरासरी 240 रुपये खर्च येईल, त्यापैकी प्रति रोप 120 रुपये सरकारी साह्य मिळेल. ईशान्य वगळता इतर भागात 50 टक्के सरकार आणि 50 टक्के शेतकरी या लागवडीसाठी काम करतील. 50 टक्के सरकारी शेअर्समध्ये 60 टक्के केंद्र आणि 40 टक्के राज्याचा हिस्सा राहील, तर पूर्वोत्तर राज्यात 60 टक्के सरकार आणि 40 टक्के शेतकरी लागवड करतील. 60 टक्के सरकारी पैशामध्ये 90 टक्के केंद्र आणि 10 टक्के राज्य सरकारचे शेअर असतील. जिल्ह्यातील नोडल अधिकारी तुम्हाला संपूर्ण माहिती देतील.

3.5 लाखांची कमाई होईल
गरज आणि प्रजाती यावर अवलंबून आपण हेक्टरमध्ये 1500 ते 2500 झाडे लावू शकता. जर आपण 3×2.5 मीटर अंतरावर एक वनस्पती लावली तर एक हेक्टरमध्ये सुमारे 1500 झाडे लागवड केली जातील. एकत्रितपणे आपण दोन वनस्पती दरम्यानच्या जागेत दुसरे पीक घेऊ शकता. 4 वर्षांनंतर तुम्ही 3 ते 3.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकाल.

दरवर्षी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता नाही. कारण बांबूची लागवड सुमारे 40 वर्षे टिकते. जर आपण इतर पिकांसह शेताच्या कड्यावर 4×4 मीटर अंतरावर बांबूची लागवड केली तर चौथ्या वर्षापासून तुम्हाला एक हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे 30 हजार रुपये उत्पन्न मिळू शकेल. त्याच्या लागवडीमुळे शेतकर्‍याची जोखीम कमी होते. कारण बांबूमध्ये शेतकरी इतर शेतीदेखील करू शकतो.