ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने घेतला बळीराजाचा बळी

मावळ  : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन दिवाळीच्या तोंडावर मावळ तालुक्यातील नेसावे गावामध्ये आज दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यामध्ये आज (रविवार) सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शेताच्या बांधावर असलेल्या झाडाखाली थांबले. दरम्यान, याच झाडावर विज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शोभा अंकुश शिरसट ( वय अंदाजे ३०)  व खंडू धोंडू शिरसट (वय अंदाजे ५०, दोघे रा. नेसावे, मावळ ) अशी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत.  दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शिरसट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मावळ तसेच नेसावे गावात शोकाकुल वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिरसाठ कुठुंबिय आज नेसावे येथिल शेतात कापण्याचे काम करत होते. दुपारनंतर कापलेले भात रचत असताना अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसापासून बचावा करिता शिरसाठ कुठुंबिय शेतालगतच्या बांधावरील झाडाखाली आडोशाला थांबले होते. आणि याच झाडावर वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.