साखर उद्योगासाठी केंद्र सरकारचे फसवे पॅकेज : हर्षवर्धन पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

केंद्र सरकारने राज्यातील साखर उद्योगासाठी 8 हजार 500 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.मात्र त्यानंतर शासन निर्णयातून 4 हजार 70 कोटीच असल्याची बाब समोर आली आहे.यातून केंद्र सरकारचे फसवे पॅकेज असल्याचे स्पष्ट होत आहे.अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे नेते माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.केंद्र सरकारच्या अशा धोरणामुळे आणि फसव्या पॅकेजमुळे साखर कारखाने आणि शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, 80 लाख टन साखर सरकारने निर्यात करावी.इथेनॉल चा दर 40 वरून 53 करावा आणि साखर उद्योगाच्या पॅकेज बाबत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा यंदाच्या चालू वर्षांचा गळीत हंगाम अडचणीमध्ये सापडणार हे निश्चित आहे.या मागण्याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी.अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पाकिस्तानमधून 3 लाख टन साखर का ? : हर्षवर्धन पाटील

परदेशातून केंद्र सरकारने 21 लाख टन साखर आयात करण्यात आली.त्यामध्ये पाकिस्तानमधून 3 लाख टन साखरेचा समावेश आहे.यातून या सरकारची मानसीकता दिसून येत असून पाकिस्तानची साखर आपल्याकडे आणणे म्हणजे दुर्देवी बाब आहे.अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.