Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एका दिवसात 8 तालुक्यातील 11 कामांना सुरुवात
पुणे – Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra | राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली असून एकाच दिवशी ८ तालुक्यातील ११ कामे हाती घेण्यात आली. (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra)
शनिवारी पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) नावळी तोरवे वस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad), पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल (IPS Ankit Goyal) नावळी गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात एकाच दिवसात पुरंदर तालुक्यात नावळी, वेल्हा तालुक्यात गुंजवणे, शिरूर तालुक्यात मोराची चिंचोळी, बारामती तालुक्यात बाबूडी, इंदापूर तालुक्यात मदनवाडी, खेड तालुक्यात जरेवडी, रासे, तसेच जुन्नर तालुक्यात आणे पोडगा व आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर अशा ११ ठिकाणी एकाच दिवसात कामे सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागांतर्गत १ हजार १६ पाझर तलावांची यादी तालुकस्तरीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी ३७ कामांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ही कामे लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक तालुक्यातून १० कामे सुरू करण्यात येणार आहेत. (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra)
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण व तलावातील गाळ उपसून शेतात पसरविल्यास कृषि उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची व तलावाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. तलावातील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकावयाचा असल्यास संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. या योजनेसाठी इंधन व यंत्रसामुग्रीसाठी लागणारा प्रति घनमीटर रु. ३१ एवढा खर्च राज्य शासन देणार आहे.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सीमांत, अत्यअल्पभूधारक ( १ हेक्टर पर्यंत) व लहान (१ ते २ हेक्टर) शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये याप्रमाणे अडीच एकर क्षेत्रासाठी ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी – येत्या काळातील संभाव्य पाणी संकटावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी
आपल्या परिसरातील पाणीसाठ्यातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवणे त्यांची कायमस्वरूपी
निगा राखणे व पाण्याचा अपव्य टाळून योग्य वाटप करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
जलसाठ्यातून निघालेला गाळ आपल्या शेतात टाकून शेताची सुपीकता वाढवावी यासाठी अधिकाधिक शेतकाऱ्यांनी अभियानात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा.
तसेच अशासकीय संस्थानी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा हेतू साध्य करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा.
Web Title : Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra | 11 works in 8 talukas started in
one day under silt-free dam and silt-free Shivar campaign
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Ajit Pawar | बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे, अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दात टीका
- Chief Minister-Governor Participate In G20 Mega Beach Clean-Up At Mumbai | G20 प्रतिनिधी,
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता; एकनाथ शिंदे म्हणाले – ‘स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी’ - Pune Crime News | ‘हाफ मर्डर’च्या गुन्ह्यातील आरोपींचं लपुन बिबवेवाडी ओटा परिसरात वास्तव्य; गुन्हे शाखेने आरोपी महिलेसह आवळल्या दोघांच्या मुसक्या