Senior Citizens साठी येणार शुभवार्ता ! म्हातारपणात राहणार नाही पैशाची चिंता, मोदी सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय
नवी दिल्ली: सिनियर सिटीझनसाठी मोठी शुभवार्ता आहे. वयोवृद्धांसाठी सरकार खास योजना करत आहे. जर सरकारने ही घोषणा केली तर ७० वर्ष वय असतानाही तुम्ही पेंशनसाठी एलिजिबल होऊ शकता. म्हणजेच राष्ट्रीय पेंशन योजनेमध्ये ७० वर्षांचे वयोवृद्धी खाते काढू शकतात. म्हणजेच म्हातारपणात पैशांची चिंता असणार नाही.
जाणून घ्या काय आहे प्लॅन?
पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने सरकारकडे प्रस्ताव पाठवून परवानगी मागितली आहे. नियमकाने असे म्हंटले आहे की NPS खाते उघडण्यासाठी कमाल वय ७० वर्ष करण्यात यावे. PFRDA ने प्रस्तावात याचाही समावेश केला आहे की जर कोणतीही व्यक्ती ६० वर्ष वयानंतर PFRDA सोबत जोडले जातात, तर त्यांना ७५ वयापर्यंत खाते चालवण्याचा आणि परतावा घेण्याची परवानगी आहे.
जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ?
प्राधिकरणाचे अध्यक्ष सुप्रमीत बांधोपाध्याय म्हणाले की गेल्या ३.५ वर्षात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या १५ हजार लोकांनी NPS खाते उघडले आहे. याला पाहून योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कमाल वय मर्यादा ५ वर्षांनी वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
निवृत्तिवेतनचे वय किती आहे?
NPS मध्ये वयाच्या ६० वर्षांपर्यंत जमा केलेल्या रकमेच्या आधारावर पेंशन ठरवली जाते, तर APY मध्ये पेंशन १,००० ते ५,००० रुपये यामध्ये ठरते. पेंशन किती असेल हे आपण दरमहिना जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असेल.