टूलकिट प्रकरण ! निकिता जेकब यांना हाय कोर्टाकडून दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टूलकिट प्रकरणात अ‍ॅड निकिता जेकब यांना मुंबई हाय कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. तर ग्रेटा टूलकिट प्रकरणात निकिता जेकब यांना दिल्ली कोर्टाकडून अटक वॉरंट बजावण्यात आला होता. त्यानंतर निकिता जेकब यांनी अंतिम जामिनासाठी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. तर हाय कोर्टाने निकिता जेकब याना तीन आठवड्यासाठी जामीन मंजूर केला आहे.

या दरम्यान, टूलकिट’ या प्रकरणी प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होता. त्यामध्ये ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करत दिल्ली पोलिसांनी निकिता जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी सुनावणीवेळी केली होती. तर निकिता जेकब यांच्या अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता. तो आज कोर्टाने जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. याबरोबर त्यांना अटक झाली तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असे न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी सांगितले आहे.

तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित अ‍ॅड निकिता जेकब यांना अटकेसाठी दिल्ली पोलीस मुंबईत दाखल झाले होते. टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी हिला रविवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अ‍ॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. शंतनू यांनी हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंठपीठात अर्ज दाखल केली होती. तसेच शंतनू यांना १६ फेब्रुवारीला खंठपीठाने अंतरिम जामीन दिला होता.