Gulabrao Patil | ‘खेकड्यांना चांगलं सांभाळलं असतं तर…’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचा टोला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) टीकास्त्र सोडल्याचं दिसत आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना (Shinde Group MLA) खेकड्याची उपमा दिली आहे. माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी धरण फोडलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेला आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत विधानभवनाबाहेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, खेकडा हा अत्यंत गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीळ झालेली असते, त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरणच फुटलं नसते, असा पलटवार पाटील यांनी केला आहे.
मी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) विचार आहेत, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरही गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. निश्चितपणे बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे आहेत, हे ते जरी मान्य करत असले तरी, आपण कुणाबरोबर युती करत आहोत आण आपल्या बाजुला कोण बसलंय? हेही बघणे गरजेचे आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीला मुजरा करायला जातात, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी
प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री कुटुंबासह पंतप्रधानांना भेटायला गेले होते.
त्याला मुजरा मारणं म्हणत असाल तर ती चुकीची बाब आहे. मागच्या काळात आपणही पंतप्रधानांना भेटायला जात होतात.
पण आम्ही म्हणणार नाही की, आपण मुजरा मारायला जात होतात. आपण रामराम करायला जात होतात, असं मला वाटतं.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
PM Modi to inaugurate various projects on August 1 in Pune; Know In Details