….तर बुद्धिजिवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजपा आमदाराचा तोल सुटला

बंगळुरु : वृत्तसंस्था

जर मी गृहमंत्री असतो, तर बुद्धिजीवी लोकांना गोळ्या मारण्याचे आदेश दिले असते, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी केले. तसेच उदारमतवादी आणि बुद्धिजीवी हे देशद्रोही असल्याचेही ते म्हणाले. कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार बसगौडा पाटील यांचा तोल सुटला. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पाटील हे विजयपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

[amazon_link asins=’B07C4YKR3J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97798393-917e-11e8-9b42-87686ab6c29e’]

बुद्धिजीवी लोकांकडून भारतीय सैन्याविरोधात नारेबाजी केली जाते. तर या लोकांकडून देशातील सर्वच सुविधांचा लाभ घेण्यात येतो, ज्यासाठी आपण टॅक्स देतो. सध्या देशाला धोका या बुद्धिजीवी आणि धर्मनिरपेक्ष लोकांपासून असल्याचे पाटील यांनी म्हटले. यापूर्वीही पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. पारसी लोकांनी मुस्लिमांना मदत करु नये, असे आवाहनच त्यांनी पारसी नागरिकांना केलं होतं. दरम्यान, पाटील हे अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिले होते.