युती झाल्यास खैरे ‘कसे’ निवडून येतात ते पाहू – तनवाणी

ADV

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तय्यारी पूर्णपणे झाली आहे. बूथपर्यंत यंत्रणा सज्ज झाली असून. युती न झाल्यास औरंगाबादेतून भाजपचाच खासदार राहील. मी स्वत: इच्छुकही आहे. तसेच युती झाल्यास विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे ‘कसे’ निवडून येतात हे पाहू, असे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट केले.

मनपा मुख्यालयात रस्त्याच्या यादीवर चर्चा करण्यासाठी आले असता. त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला असता. तनवाणी म्हणाले, भाजप औरंगाबाद जिल्ह्यात मजबूत झाला आहे. त्यामुळे आता युतीचा प्रश्नच नाही युती हो अथवा न हो आम्ही येथे एकतर्फी जिंकू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. युती झाली नाही तर भाजपला काहीही फरक पडणार नाही. आम्ही सहज विजय मिळवू, असा दावा त्यांनी केला. उमेदवार कोण असेल यावर ते म्हणाले, आम्ही कोणाचेही नाव सुचवलेले नाही.

ADV

परंतु, पक्षाने संधी दिल्यास मी स्वत: देखील इच्छुक आहे. चार वेळा खासदार असल्याने खैरे यांच्याविरोधात असंतोष (अँटी इन्कम्बन्सी) आहे. त्यामुळे युती झाली तरी खैरेंना ही निवडणूक अवघड जाईल. त्यामुळे सेनेने हा मतदारसंघ आमच्याकडे द्यावा, अशी आमची मागणी असून तशा भावना श्रेष्ठींकडे कळवल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही येथे मैत्रीपूर्ण लढतीचीही परवानगी मागितली आहे. मैत्रीपूर्ण लढतीतही आमचाच खासदार जिंकून येईल. अर्थात आमची मागणी मान्य झाली नाही आणि युती झालीच तर खासदार खैरे हे ‘कसे’ निवडून येतील यासाठी ‘एक नंबर’ प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

शिवसैनिकच करतील खैरेंना पाडण्याचा प्रयत्न

युती झाल्यानंतर खैरे ‘कसे’ निवडून येतील ते आम्ही ‘पाहू’, याचा खुलासा करतांना ते म्हणाले, युतीत खासदार खैरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच राहणार आहे. कारण खैरे यांना पाडण्यासाठी शिवसेनेचेच पदाधिकारी प्रयत्न करतील, असा दावा त्यांनी केला. ते पदाधिकारी कोण याबाबद त्यांनी सांगितले नाही. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला खासदारांची गरज आहे.