धक्कादायक… हुंड्यासाठी दोन सुनांची दीड लाखांना विक्री

विरार : पोलीसनामा ऑनलाईन – विरारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन सुनांचा हुंड्यासाठी छळ करुन  सासरच्या मंडळींनी  दीड लाख रुपयांना त्यांची विक्री केल्याची  खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही सुना एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत.तसेच या दोन्ही बहिणींवर अत्याचारही करण्यात आल्याचं समोर आलं आहे.  याबाबत विरार पोलीस ठाण्यात सासरच्या १२ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सरकारला जमलेबाज म्हणणारी शिवसेनाच मोठा जुमला : विखे पाटील

विरार पश्चिमेच्या एम बी इस्टेटमधील सुमन कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या रावल कुटुंबातील संजय आणि वरुण या दोन भावांचे दोन सख्ख्या बहिणींशी १० मार्च २०१५ रोजी लग्न झालं होतं. संजय हा बिझनेसमन आहे, तर वरुण हा सीए आहे. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच रावल कुटुंबियांनी या दोन्ही बहिणीचा हुंड्यासाठी अतोनात छळ करण्यास सुरुवात केली.दुकान टाकण्यासाठी माहेरहून  पाच लाख रुपये आणावेत अशी वारंवार मागणी करण्यात येत होती.

सासरच्या लोकांनी त्यांच्या  वडिलांकडून ५  लाख घेतलेही तरीही  त्यानंतर पुन्हा ४ लाखांची मागणी केली. पण ती पूर्ण न केल्याने  सासरच्या मंडीळीनी दोन्ही सुनांचा  शारीरिक, मानसिक छळ सुरु केला.

हैद्राबादहून पुण्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इंजिनिअरला अटक

अशी घडली घटना –
३० ऑगस्ट २०१८ रोजी विरारमधील रावल कुटुंबीय या दोन्ही सुनांना घेऊन सर्व कुटुंबासह त्यांच्या मूळगावी राजस्थान येथे घेऊन गेले.  १ ते ९ सप्टेंबरपर्यंत त्यांना राजस्थानच्या सिरोहा जिल्ह्यातील पिनवाडा तालुक्यात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी कुटुंबातील काहींनी त्यांचा लैंगिक, मानसिक आणि शारीरिक छळ करून, पुन्हा त्यांना तुमच्या पतीकडे विरारला जा असे सांगून विराराला एका अनोळखी इसमासोबत रेल्वेने पाठवलं. वसईला रेल्वे  थांबल्यानंतर त्या उतरण्याचा प्रयत्न करीत असताना त्या अनोळखी माणसाने मात्र त्यांना उतरण्यास विरोध केला व  तुमच्या सासऱ्यांनी दीड लाखरुपयात तुमची विक्री केली आहे. ते पैसे  मी कसे वसूल करतो, ते पहा  अशी धमकीही त्यांना दिली.
रेल्वेत हा सर्व प्रकार सुरु असताना  रेल्वेतील एका गुजराथी आणि साऊथ इंडियन कुटुंबाच्या ही गोष्ट लक्षात आली व त्यांनी  या दोन्ही पीडित मुलींना मदत करुन वसईत उतरवले आणि त्यामुळे त्याची सुटका झाली. त्यानंतर त्या नालासोपारा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावासोबत विराराला आल्या.त्यावेळेस  त्या दोघींचे नवरे विरारला घरी नव्हते.

सरकारला जमलेबाज म्हणणारी शिवसेनाच मोठा जुमला : विखे पाटील

ही हकीकत त्यांच्या शेजाऱ्यांना  कळली  व  त्यानंतर सोसायटीत राहणाऱ्यांनी दोन्ही बहिणींना मानसिक आधार  देऊन त्यांना विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला लावली.  मात्र पोलिसांनी एका महिन्यापासून त्यांची तक्रारच घेतली नाही. शेवटी पोलीस अधिक्षकांकडेतक्रार दिल्यानंतर  त्यांच्या आदेशावरून  विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सासरच्या पती, दीर, सासू, सासरे यांच्यासह १२  लोकांवर आरोपपत्र दाखल केले असून पती संजय रावल, दीर वरुण रावल, सासू लिलादेवी रावल, सासरे मोहनलाल रावल, मामे सासरे गजेंद्र रावल, काकी सासू आशा रावल यांच्यावर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली  नसून याप्रकरणी  तपास सुरु असल्याचे पोलीस सांगत आहेत.