भारतातील मुलींचा पहिला ‘पॉप बँड’ 18 वर्षांनंतर परत आला ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –ही 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे म्हणजेच 2002 सालची. 5 मुलींचा एक पॉप बँड खूप फेमस झाला होता. याचं नाव होतं VIVA. हा इंडियातला पहिला ऑल गर्ल्स पॉप बँड होता. या 5 मुलींनी कोक चॅनल V पॉपस्टर काँटेस्ट जिंकली होती. नंतर बनला होता हा बँड. याचे दोन अल्बमही आले होते. नंतर दोन वर्षांची हा बँड विखुरला. सर्व मुली इंडिपेंडंट सिंगर बनण्याच्या मार्गावर गेल्या. यानंतर आता 18 वर्षांनी VIVAच्या मुली पुन्हा एकत्र आल्या आहेत. त्यांनी एकत्र येत त्यांचं फेमस गाणं जागो जरा गायलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

परंतु गाण्यात मात्र 4 सिंगर्सच दिसत आहेत. अनुष्का मनचंदा, नेहा भसीन, महुआ कामत, प्रतिची महापात्रा. सीमा रामचंदानी हिनं पहिला अल्बम आल्यानंतरच बँड सोंडला होता.

कसं बनवलं गाणं ?

लॉकडाऊन असल्यानं सर्व सिंगर्स घरीच आहेत. त्यानं आपापल्या कॅमेऱ्यात जागो जरा गाणं गायलं आहे आणि नंतर एकत्र करत एडिट केलं आहे. अनुष्का मनचंदा हिनं हे गाणं इंस्टावरून शेअर केलं आहे. सोबतच तिनं इमोशनल पोस्टही लिहिली आहे.

कसा तुटला बँड ?

2002 साली VIVA चा पहिला अल्बम आला होता. 2003 मध्ये दुसरा VIVA रिलोडेड. बँडचे हम नए गीत सुनाए, चोरी चोरी, जहा हो प्यार का मौसम, जागो जरा ही गाणी खूप फेमस झाली होती. नंतर बँड वेगळा झाला होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं. त्यांनी असंही सांगितलं की, त्यांच्यावर वजन कमी करण्यासाठी प्रेशर बनवलं जात होतं. प्रत्येक एक किलो कमी करण्यासाठी त्याना 5 हजार मिळतील असंही सांगितलं जात होतं.