‘सुप्रीम कोर्टात एकच महिला न्यायाधीश उरणे चिंताजनक’ – न्या. चंद्रचूड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्ट यंग लॉयर्स फोरमने न्या. इंदू मल्होत्रा यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात केवळ एकच महिला न्यायाधीश उरणे ही चिंतानजक बाब असून, याचे गांभीर्याने आत्मपरीक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले की, न्या. मल्होत्रा यांच्या सेवानिवृत्तीचा अर्थ असा, की आता सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठात एकच महिला न्यायाधीश उरल्या आहेत. माझ्या मते एक संस्था म्हणून ही बाब अतिशय चिंतानजक आहे. प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर जिच्या निर्णयामुळे परिणाम होतो, अशी संस्था म्हणून आपण अधिक चांगली कामगिरी करायला हवी’, असे ते म्हणाले.