“भिडे गुरुजींच्या शिष्यांकडून अजून काय अपेक्षा करायच्या”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी मेळघाटात मांत्रिकाची मदत घेऊ, अशी बातमी आली होती, त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी ऐकून आणि वाचून धक्का बसला आहे. हे वक्तव्य करणारा, मग तो मंत्री का असेना त्याचा राजीनामा घ्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे.

आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हीडिओला त्यांनी ‘भिड्यांच्या शिष्यांकडून अजून काय अपेक्षा करायच्या’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हीडिओमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला भगताच्या दारातून बाहेर काढून डॉक्टरकडे जाण्याची सवय लावली. आता बुवाबाजी, मांत्रिक, भगत यांचे रस्ते दाखवा. डॉ. दाभोळकर यांचा खुन यासाठीच केला. कारण तुम्हाला महाऱाष्ट्र भगताच्या दारात उभा करायचा होता, अशी टीका त्यांनी केली आहे.

ज्यांनी कोणी हे वक्तव्य केले आहे, त्याचा तात्काळ राजीनामा घ्या. कुठलाही मंत्री असो तो, कारण का अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत भगताचा वापर करा, असं सांगणाराही गुन्हेगारच आहे, असं स्पष्ट मत त्यांनी यात व्यक्त केलं आहे.
खरं सांगायचे झाले तर हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे. जनता रुपी जो भक्त आहे तो मतांच्या झाडूचे फटके देऊन उतरवणार आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी मांत्रिक वापरणार, या एका गोष्टीने लाज आणली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर जबाबदाऱ्या घ्यायला शिका, असं सुचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.