‘करीना-दीपिका’ला भावली PM मोदींची ‘मन की बात’ ! ट्विट करत म्हणाल्या…

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (रविवार दि 31-1-21) रोजी मन की बात च्या माध्यमातून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानावर भाष्य केलं. त्यांनी महिलांच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यांच्या या कौतुकानंतर आता बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) इम्प्रेस झाल्याचं दिसत आहे. कारण मोदींचं मन की बात संपल्यांनतर लगेच त्यांनी मन की बात हॅशटॅग वापरत ट्विट केलं आहे.

काय म्हणाली करीना कपूर ?

करीना कपूरनं आपल्या ट्विट मध्ये लिहिलं की, नॉन स्टॉप फ्लाईट्सपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यापर्यंत समाजातील महिलांची भागिदारी कित्येक पटीनं वाढली आहे. देशाची लेक आज निर्भिड, शूर आणि राष्ट्र उभारणीच्या कामात बरोबरीनं काम करत आहे.

दीपिकानं देखील महिला सशक्तीकरणाचं कौतुक केलं. तिनं भारताच्या पीएमओओचं एक ट्विट रिट्विट करत सोबत महात्मा गांधी यांचं कोट लिहिलं आहे. ती लहिते की, तुम्हाला जगात जसा बदल हवा आहे तसं बना- महात्मा गांधी. हे शब्द जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत असंही ती आपल्या ट्विटमध्ये म्हणाली.

करीना आणि दीपिका यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.