Maharashtra BJP | ‘बाळासाहेबांनी जे कमावलं, ते उद्धवरावांनी गमावलं, आदित्यने धुळीला मिळवलं’, ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra BJP | इंडिया आघाडीची तिसरी बैठक (INDIA Alliance Meeting) आज आणि उद्या मुंबईत होत आहे. या बैठकीमध्ये आघाडीच्या संयोजकांचे नाव निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (Congress National President) मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjuna Kharge) यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐनवेळी काही नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे नाव समोर येऊ शकते. इंडिया आघाडीची स्थापना होऊन काही महिने झाले तरी अद्याप संयोजकाच्या नावावर एकमत झाले नाही. याच दरम्यान महाराष्ट्र भाजपने (Maharashtra BJP) घणाघात केला आहे.

बाळासाहेबांनी जे कमावलं, ते उद्धवरावांनी गमावलं, आदित्यने (Aaditya Thackeray) धुळीला मिळवलं, ज्वलंत हिंदुत्ववादी ते ढोंगी पुरोगामित्त्वाचा किळसवाणा प्रकार, असं म्हणत भाजप महाराष्ट्रने (Maharashtra BJP) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्र भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत पाकिस्तान (Pakistan) धार्जिणे, देशविरोधी तत्वांची मुंबईत येण्याची हिंमत होत नसायची. पण आता दुर्दैवाने बाळासाहेब आपल्यात नाहीत, तर मुंबईत सत्तेच्या हव्यासाने पाकिस्तान धार्जिणे, देशविरोधी तत्व मुंबईकडे निघाली.

बाळासाहेबांचा वारस असलेल्या उद्धव ठाकरेंना असाकाही सत्तामोह झालाय की, बाळासाहेब ज्या देशविघातक तत्वांविरोधात आयुष्यभर लढले. त्यांच्यासाठी त्यांचाच पुत्र उद्धव पायघड्या आंथरत आहे. बाळासाहेब हिंदू शेर म्हणून देशभर लोकप्रिय होते तर, “उद्धव” टोमणेबाज म्हणून नावारूपाला आलेत. अखंड भारताला कलंक असलेल्या आर्टिकल 370 चे (Article 370) समर्थन करणारे फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah), महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) उद्धव ठाकरेंसाठी विशेष अतिथी झालेत. ज्या ज्या नेत्यांना पाकिस्तानबद्दल विशेष प्रेम आहे. ते सर्व घमंडिया गठबंधनमध्ये सामील झालेत आणि उद्धव ठाकरे व शरद पवार त्यांचे सेवेकरी.

स्वर्गीय बाळासाहेब नेहमी सांगायचे की ज्या दिवशी त्यांना त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा करण्याची वेळ येईल,
तेव्हा ते त्यांचा पक्ष बंद करतील. पण सध्या घमंडिया गठबंधनची अशी काही झापडं त्यांच्या पुत्राच्या डोळ्यावर आहे
की उद्धव ठाकरे भारतीय लष्कराच्या (Indian Army) पराक्रमावर शंका घेऊ लागलेत.

“विनाश काले विपरीत बुद्धि”

मराठी जनतेने बाळासाहेबांनी मुंबईतून देश बंदची हाक देऊन, संपूर्ण देश बंद होताना पाहिलाय.
अगदी पाकिस्तानचा विरोध करायला खेळपट्ट्या उखडणारे शिवसैनिक (Shiv Sainik) पाहिलेत.
आता मराठी जनता “देशविरोधी लोकांची” हुजरेगिरी करणारे, “सोनिया” गांधीसमोर (Sonia Gandhi) वाकणारे
उद्धव ठाकरे पाहत आहेत, हेच काय दुर्दैव. असं भाजप महाराष्ट्रने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना…’ विरोधकांच्या बैठकीवरुन भाजपचा ठाकरे गटावर हल्लाबोल