मनसुख हिरेन प्रकरण ! चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला प्रश्न, म्हणाल्या – ‘प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या राहत्या घरासमोर स्फोटकाने भरली असेलल्या स्कॉर्पियो कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. तर स्फोटकं ठेवून कार घराबाहेर कुणी लावली. यावरूनच गेले काही दिवस तपास सुरू होता. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आढळून आला. त्यामुळे या प्रकरणावरून अनेक घडामोडी बाबत चर्चा होत असून, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गेल्या काही घटनांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे.

या प्रकरणावरून भाजपाच्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत सरकारकडे निष्पक्ष चौकशीची अपॆक्षा केली आहे. आणि महाराष्ट्रात मागील काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन, प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी, या सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?, असा थेट प्रश्न ठाकरे सरकारला केला आहे.

दरम्यान, मुंब्रातील रेतीबंदर परिसरात हिरेन यांचा मृतदेह सापडला. ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्यानं आता शंका विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. तर या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी, अशी मागणी भाजपचे आशिष शेलार यांनी पूर्वीच सरकारकडे केलेली होती. सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. असे त्यांनी म्हटलं होतं.