मराठवाडा, खान्देशात मुलीचे बालविवाह सर्वाधिक, आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणाचा अहवाल

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – देशात बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी सरकारपासून सामाजिक संस्था, संघटना या सर्वांकडून प्रयत्न केले जात आहे. एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात आहे. असे असतानाही राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. राज्यात 21.9 टक्के मुलींचे बालविवाह लावून दिले जात आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे मराठवाडा, खान्देश या दुष्काळी भागात बालविवाहांचे प्रमाण तब्बल 45 टक्क्यांच्याही पुढे गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही मुलीचे बालविवाह सर्रासपणे लावले जात असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाचव्या कुटुंब सर्वेक्षणातून मुलींच्या बालविवाहाचे हे गंभीर तथ्य पुढे आले आहे. बालविवाहाचे प्रमाण वाढले देशभरातील कुटुंबांची सखोल व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी हे सर्वेक्षण केले जाते. 2019-20 मधील ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यातून महाराष्ट्रात मुलींच्या बालविवाहांचे प्रमाण 21.8 टक्के असल्याचे स्पष्ट होते. चार वर्षांपूर्वी 2015-16 मधील सर्वेक्षणातून महाराष्ट्रात 26.3 टक्के बालविवाह होत असल्याची आकडेवारी पुढे आली होती. चार वर्षांत ही आकडेवारी चार टक्क्यांनी घटली आहे.

महाराष्ट्रातील बालविवाहांचे सरासरी प्रमाण चार टक्क्यांनी घटले असले, तरी जिल्हानिहाय विचार करता, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील बालविवाह मात्र वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे, तेथे बालविवाह कमी झाले आहेत. सर्वेक्षणानुसार. राज्यातील शिक्षित महिलांचे प्रमाण 84.6 टक्के आहे, तर बालविवाहांचे प्रमाण 21.9 टक्के आहे. विशेष म्हणजे, शहरी भागात 90.2 टक्के महिला शिक्षित असूनही तेथे 15.7 टक्के बालविवाह झाले.
जिल्हानिहाय बालविवाहाची आकडेवारीः

मराठवाडा
औरंगाबाद 35.8%
नांदेड 32.2 %
लातूर 31%
जालना 35 %
परभणी 48 %
हिंगोली 37.1१%
बीड 43.7%
उस्मानाबाद 36.6%

पश्चिम महाराष्ट्र
पुणे 24%
सातारा 18.1%
सांगली 27%
कोल्हापूर 21%
सोलापूर 40%

कोकण
पालघर 14.6%
ठाणे 18.4%
मुंबई 4.5%
मुंबई उपनगर 10%
रायगड 16%
रत्नागिरी 4.4%
सिंधुदुर्ग 5%

उत्तर महाराष्ट्र
नाशिक 29.6%
अहमदनगर 26.9%
धुळे 40.5 %
नंदुरबार 24%
जळगाव 28%

विदर्भ
यवतमाळ 11.7%
गडचिरोली 10.1%
नागपूर 7.1%
वर्धा 9%
वाशिम 27.7%
गोंदिया 6.5%
चंद्रपूर 9%
भंडारा 1.5%
अमरावती 9.8%