PNB स्कॅमनंतर पहिल्यांदा भारतातून पळाला, आता अँटीगुआमधून सुद्धा बेपत्ता झाला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी बेपत्ता झाला आहे, ज्यानंतर अँटीगुआ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकार्‍यांनी मंगळवारी यास दुजोरा दिला. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सुद्धा अँटीगुआच्या स्थानिक रिपोर्टनंतर ताबडतोब दुजोरा दिला. चोक्सीने अँटीगुआमध्ये एक नागरिक म्हणून आश्रम मागितला आहे. वकीलाने म्हटले की, तो सोमवारी आपल्या घरातून बेटाच्या दक्षिण भागातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण करण्यासाठी निघाला. यानंतर परत आला नाही.

अँटीगुआ न्यूज रूम डॉट कॉमच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची कार रात्री उशीरा जॉली हार्बरमध्ये सापडली आहे. मात्र, तो कारमध्ये नव्हता.

हिंदूस्तान टाइम्सशी बोलताना चोक्सीचे वकील अग्रवाल यांनी म्हटले की, मेहुल चोक्सी बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबाचे सदस्य चिंतेत आहेत. त्यांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. अँटीगुआ पोलीस याचा तपास करत आहेत. कुटुंब त्यांच्या सुरक्षेबाबत काळजीत आहेत.

अ‍ॅटीगुआ आणि बारबुडामध्ये राहणारा 61 वर्षीय भारतीय उद्योजक आणि गीतांजली समुहाचा मालक मेहुल चोक्सीला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाँटेड घोषित केले आहे. मेहुल चोक्सीने मेगा-घोटाळे समोर येण्याच्या एक महिना अगोदर 4 जानेवारी, 2018 ला अँटीगुआला पळून जाण्याअगोदर 13,578 कोटींच्या पीएनबी फसवणुकीत सुमारे 7,080 कोटी रूपयांना चूना लावला.

चोक्सीच्या विरूद्ध पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. तो कथित प्रकारे 2013 मध्ये शेयर बाजारात फसवणुकीत सहभागी होता. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत फसवणुक केल्यानंतर चोक्सी देश सोडून पळून गेला. नंतर त्यास फरार घोषित करण्यात आले. मागच्या वर्षी दाखल एका चार्जशीटध्ये ईडीने दावा केला होता की, चोक्सीने भारतीय बँकांसह दुबई आणि संयुक्त राज्य अमेरिकेत सुद्धा ग्राहक आणि बँकांना चूना लावला आहे. त्याची 2,500 कोटींची संपत्ती ताब्यात घेण्यात आली आहे.

या वर्षीच्या सुरूवातीला अँटीगुआ आणि बारबुडाने नोव्हेंबर 2017 मध्ये कॅरेबियन राष्ट्राच्या नागरिकत्वाद्वारे गुंतवणूक कार्यक्रम म्हणजेच सीआयपीच्या अंतर्गत देण्यात आलेले फरार हिरे व्यापार्‍याचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु त्याने न्यायालयात सरकारच्या पावलांना आव्हान दिले. या प्रकरणाशी संबंधीत लोकांनी ही माहिती दिली.

या घटनाक्रमाशी संबंधीत लोकांनुसार, चोक्सीला मागच्या वर्षी अँटीगुआ आणि बारबुडाच्या अधिकार्‍यांनी त्याचे नागरिकत्व रद्द करण्याच्या प्रक्रियेच्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षी मार्चमध्ये दावा केला केला होता की, फरार उद्योगपती विजया माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी कायद्याला सामोरे जाण्यासाठी भारतात परत येत आहेत. सीतारामन यांनी राज्यसभेत वीमा सुधारित विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली होती.